Devavrat28/peshwai-historian-ai
Updated
•
1
text
stringlengths 0
147
|
---|
Peshwaai
|
पेशवाई ... पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक सुवर्णपानच. थोरल्या महाराज
|
श्री शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या अस्तानंतर आता स्वराज्य नामशेष होणार की
|
काय अशी भीती वाटत असतानाच महाराष्ट्राला एक सुंदर स्वप्न पडले! बाळाजी विश्वनाथ
|
भट ...
|
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राची जी वाताहात झाली होती, मोगली फौजांनी
|
महाराष्ट्राची जी वाट लावली होती, तेच चित्र अठराव्या शतकाच्या सुरुवातीस पालटू लागले.
|
इ. स. १७०७ मध्ये शाहजादा आझमशहाच्या कैदेतून सुटून शाहूराजे महाराष्ट्रात आल्यानंतर
|
हाच आपला खरा राजा आहे हे अचूक ओळखून बाळाजीपंतांनी आपले संपूर्ण आयुष्यच
|
शाहूराजांच्या सेवेत अर्पण केले. बाळाजी विश्वनाथांसारख्या 'अतुल पराक्रमी सेवका' ची ती
|
प्रेमळ राजनिष्ठा पाहून शाहूराजेही भारावून गेले. त्यांनी बाळाजीपंतांना स्वराज्याचे पेशवेपद
|
बहाल केले.
|
बालाजी विश्वनाथ पेशव्यांनी तीस वर्षे मोगलांच्या कैदेत खितपत असलेल्या
|
राजघराण्यातील कबिल्याची अन् असामींची सुटका केली आणि त्याशिवाय स्वराज्याचे 'पोट
|
भरावे' यासाठी राजकारणं करून चतुराईने दिल्ली दरबारातून चौथाई- सरदेशमुखीच्या
|
सनदाही मिळवल्या. या सनदा म्हणजे भविष्यातील पातशाहीला नामोहरम करण्याची पहिली
|
पायरी होती.
|
बालाजी विश्वनाथांनंतर त्यांच्याइतक्याच हुशार, कर्तबगार आणि पराक्रमी असणाऱ्या
|
त्यांच्या ज्येष्ठ पुत्राला, बाजीरावांना दरबारातील अनेक मंत्र्यांचा विरोध असतानाही शाहू
|
महाराजांनी पेशवेपदी नेमले. बाजीरावांनीही शाहूराजांचा विश्वास सार्थ करून दाखवला.
|
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळ तीस वर्षांच्या काळातच मराठी फौजा थेट दिल्लीवर जाऊन
|
धडकल्या. पेशव्यांच्या या 'झंझावाती' फौजांना अडवण्याची हिंमत आता एकाही यवनी
|
पातशाहीत उरली नव्हती. परंतु केवळ दुर्दैवाने वयाच्या केवळ अवघ्या चाळीसाव्या वर्षी हा
|
पराक्रमी पेशवा जग सोडून गेला ...
|
<<<
|
बाजीराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर शाहूराजांनी नानासाहेब ऊर्फ बाळाजी बाजीराव यांना
|
पेशवेपद दिले. नानासाहेब वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षापासून साताऱ्यात राहून
|
राज्यकारभाराचे घेत असल्याने, शाहू राजांची त्यांच्यावर फार मर्जी होती. इ.स. १७४९
|
मध्ये शाहू राजांनी आपल्या मृत्यूपूर्वी राज्याची सारी जबाबदारी आणि राज्यकारभाराचे सारे
|
हक्क फक्त पेशव्यांना बहाल केले. त्यामुळे छत्रपतींऐवजी पेशवे आता महाराष्ट्राचे सार्वभौम
|
परंतु अनभिषिक्त राज्यकर्ते झाले. मराठ्यांची कागदोपत्री राजधानी म्हणून 'सातारा' असले
|
तरीही पुण्याच्या 'शनिवारवाड्याला' अधिक महत्त्व प्राप्त झाले. पेशव्यांच्या खड़्गाची अन्
|
शनिवारवाड्याच्या फडाची कीर्त साऱ्या शत्रूंच्या उरात भरवत होती. परंतु १७६१ च्या
|
झालेल्या प्रचंड नरसंहारानंतर केवळ पाच महिन्यातच नानासाहेब जग सोडून
|
गेले. नानासाहेबांचा थोरला पुत्र विश्वासराव पानिपतावर पडला असल्याने त्यांच्या द्वितीय
|
पुत्रावर- माधवरावावर वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी पडली. या
|
तरुण पेशव्याने आपल्या चुलत्याच्या राज्यलालसेला आणि परकीय शत्रूंना प्रसंगी चुचकारून
|
वा प्रसंगी धाक दाखवून नियंत्रणात ठेवले आणि वयाची सत्तावीस वर्षे पूर्ण होतात न होतात
|
तोच माधवरावही दौलतीला पारखे झाले.
|
माधवरावसाहेबांचा मृत्यू ही जणू मराठी सत्तेच्या उतरत्या कळेची नांदी होती. 'परशुराम
|
चरित्र' या ग्रंथाचा कवी वल्लभदास याने तर बाळाजी विश्वनाथांच्या रूपाने परशुराम या
|
पृथ्वीवर पुन्हा अवतरले आणि आता माधवरावांच्या मृत्यूने भार्गवरामाचाही अवतार संपला
|
असेच सूचित केले आहे. कारण माधवरावांनंतरच्या एकाही पेशव्याच्या हातात राज्याची
|
संपूर्ण मुखत्यारी कधीही राहिली नाही. तसं म्हटलं तर खरी 'पेशवाई' ही केवळ बावीस वर्षेच
|
होती. कारण इ. स. १७५० मध्ये शाहू महाराजांच्या मृत्यूपर्यंत पेशव्यांना महत्त्व असले तरी ते
|
'सार्वभौम' नव्हते आणि यानंतरच्या काळात, इ. स. १७७२ मध्ये माधवरावांचा मृत्यू
|
झाल्यानंतर बारभाई कारस्थानापासून पेशवेपद हे कोणालाही मिळाले तरी सारे राज्य
|
'कारभारी' च पाहत असत. नारायणराव आणि सवाई माधवरावांच्या काळात सारा कारभार
|
नाना फडणवीस आणि महादजी शिंदेच बघत होते. पुढे बाजीराव पेशव्यांनी काही काळ
|
स्वतः कारभार पाहिला, परंतु या काळात राज्याचे काहीही भले न होता नुकसानच झाले.
|
अखेरच्या काळातही त्रिंबकजी डेंगळ्यांसारखे कारभारीच राज्य चालवत होते. परंतु, तरीही
|
एकूणच पाहता या कारभाऱ्यांनीही 'राज्य' उत्तमरीत्या सांभाळले आणि विस्तार केला यात
|
तिळमात्रही शंका नाही.
|
आज पेशवाई आणि पेशव्यांबाबत जनमानसात प्रचंड गैरसमज पसरले आहेत. या
|
गैरसमजांमुळेच अनेक लोकांना (आणि इतिहासकारांनाही) पेशवाई ही 'मोगलाई'पेक्षाही
|
वाईट वाटते. यात इतर अनेक तांत्रिक आणि वैचारिक गोष्टी असल्या तरीही याचे मुख्य
|
कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेले जातीयवादाचे विष !! पेशवे हे
|
ब्राह्मण होते आणि केवळ याच कारणाने आजपर्यंत स्वतःला ‘सेक्युलर' म्हणवणाऱ्या
|
इतिहासकारांनीही पेशव्यांच्या कार्याचे योग्य मूल्यमापन न करता त्यांची कायम अवहेलनाच
|
केली. इतिहासकारांचा असा आक्षेप आहे की, पेशवाईतच 'जातीय निर्माण झाली. परंतु
|
<<<
|
एका अस्सल समकालीन पत्रातून यासंबंधी बरीच कल्पना येते "खावंदांचे (पेशव्यांचे) घरी
|
सर्व लहान-मोठे आहेत, बरे-वाईट आहेत परंतु आपपरत्वे जातीचा अभिमान हा काही एक
|
नसावा. सर्वही खावंदांची लेकरे. आम्ही (सर्व) सेवक हे जाणतो की देशस्थ, कोकणस्थ,
|
कऱ्हाडे, प्रभू, शेणवी, मराठे (इ.) सर्व स्वामींचे. स्वामी इतक्यांचे मायबाप. चाकरी मात्र
|
सर्वांनी करावी. जातीभेद अभिमान नसावे." सरदार नाना पुरंदरे यांच्या या
|
पत्रावरूनच तत्कालीन व्यवस्थेत, निदान स्वतः पेशव्यांच्या आचरणात जातीभेद नव्हता
|
स्पष्ट दिसून येते. श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या आणि सवाई माधवरावांच्या काळात
|
'रमण्यां' वर फार खर्च केला जात होता ही गोष्ट खरी असली तरीही ब्राह्मण नाही म्हणून
|
एखाद्यावर अन्याय केला जात होता हा शुद्ध गैरसमज आहे.
|
श्रीमंत दुसऱ्या बाजीरावांच्या काळात उलथापालथ झाली. त्यांनी त्रिंबकजी डेंगळ्यांना
|
आपला मुख्य कारभारी बनवलं. या त्रिंबकजींना मराठी माणसांनी तोंडभरून शिव्या दिल्या,
|
परंतु त्यांचा कट्टर शत्रु, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन त्यांच्याविषयी म्हणतो- " ... मराठ्यांशी युद्ध
|
पुकारण्यापूर्वी त्रिंबकजीला कारभारी पदावरून खाली ओढलं पाहिजे. पेशवाईचा खरा
|
सूत्रधार त्रिंबकजी डेंगळे आहे. त्याला दूर केल्याशिवाय आपला कोणताही कार्यभाग
|
साधणार नाही. पण त्रिंबकजीचा कुठल्यातरी कटाशी संबंध जोडल्याखेरीज ही संधी कशी
|
मिळणार याची मला चिंता आहे." आता एल्फिन्स्टनसारखा बुद्धिमान कट्टर
|
डेंगळ्यांचं कौतुक करत असताना आमच्याच माणसांनी त्यांच्यावर चिखल उडवण्याचं पाप
|
केलं यात नवल काहीच नाही
|
पेशवाईबद्दलचं माझं हे लिखाण म्हणजे समग्र पेशवाईचा इतिहास नक्कीच नाही. मी
|
स्वतः कोणी इतिहासकार अथवा इतिहास संशोधक नाही. केवळ एक लहानसा अभ्यासक
|
आहे. जगात एकासारखा दुसरा माणूस होणे केवळ अशक्य आहे. थोरल्या छत्रपती श्री
|
शिवाजी महाराजांच्या तोडीचा नंतर जन्मला नाही. तो जन्माला येणं शक्यही नाही.
|
त्यांच्यानंतर महाराष्ट्रात काही शूर, पराक्रमी आणि उदार असे पुरुष झाले. शिवाजी
|
महाराजांच्या मृत्यूनंतर दोन तपांच्या काळातच बाळाजी विश्वनाथांचा उदय झाला आणि
|
त्यांच्या पराक्रमी वंशजांनी शिवरायांचे 'हिंदवी स्वराज्याचे' स्वप्न बऱ्याच अंशी पूर्ण केले.
|
वास्तविक पाहता लो. टिळक म्हणाले त्याप्रमाणे 'पेशव्यांच्या अतुल पराक्रमाने मराठी
|
राज्याचा मृत्यू शंभर वर्षांच्या एका दिवसाने लांबणीवर पडला' हीच अत्यंत सुदैवाची गोष्ट
|
होती. परंतु महाराष्ट्राने मात्र पेशव्यांना कायमच उपेक्षित ठेवलं. काही स्वार्थी लोकांनी तर
|
शिवशाहीला 'मराठेशाही' आणि पेशवाईला 'ब्राह्मणशाही' अशी विशेषणं बहाल केली.
|
यातूनच पुढे जातीयवादाची ठिणगी आणखीनच शिलगावली गेली.
|
पेशव्यांबाबत अनेक गैरसमज पसरवले गेले. अन् म्हणूनच पेशवाईची तोंडओळख
|
आणि त्यांच्याबद्दलचे जनमानसात असणारे गैरसमज दूर करण्याचा माझा हा मनापासून
|
केलेला लहानसा प्रयत्न आहे. हे पुस्तक परिपूर्ण आहे असा माझा अजिबात दावा नाही.
|
किंबहुना, आजही हजारों कागद धूळ खात पडून आहेत. ते उजेडात आले की कदाचित नवा
|
इतिहास समोर येईल. परंतु, उपलब्ध आणि महत्त्वाच्या अशा निवडक साधनांच्या आधारे
|
<<<
|